पर्यावरणाच्या मुद्द्यांचा आपल्याशी असलेला संबंध उलगडून दाखवणे, त्याबाबत सजग करणे, कृतिशील उपाय सुचवणे यासाठी भवताल मॅगझिन. सोबतच महाराष्ट्रातील नैसर्गिक संसाधनांचे दस्तावेजीकरण करणे हाही एक उद्देश. त्यातील मजकूर महत्त्वाचा आहेच, पण वाचकांना आकर्षित करण्यासाठी त्याची आकर्षक आणि रंजक पद्धतीने मांडणी, म्हणजे भवताल मॅगझिन! Register
• "भवताल" ची प्रमुख ओळख म्हणजे दिवाळी विशेषांक. त्याद्वारे महारष्ट्राचा एक महत्त्वाचा घटक निवडला जातो. त्यावर सर्व अंगांनी अभ्यासपूर्ण व आकर्षक पद्धतीने प्रकाश टाकला जातो.
• "भवताल" चा यावर्षी नववा दिवाळी अंक विषय आहे: माळराने.
• त्यात "माळराने" या अतिशय महत्त्वाच्या घटकावर विविध अंगांनी प्रकाश टाकला आहे. त्यातून माळरानांची खरी ओळख होईल.
• अंक घरपोच मिळवण्यासाठी नावनोंदणी करा.
अधिक माहितीसाठी :
9545350862
[email protected]
भवताल तर्फे गेल्या वर्षीप्रमाणे येत्या पावसाळ्यातही संपूर्ण महाराष्ट्राभर सामूहिकरित्या पाऊस मोजला जाणार आहे. हा उपक्रम जून ते ऑक्टोबर या काळात केला जाईल. या काळात दररोज १५ - २० मिनिटे (शक्यतो सकाळच्या वेळी) द्यायची तयारी असेल तर तुम्हीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकता. १० वर्षांच्या पुढील कोणीही यात भाग घेऊ शकेल. लहान मुले पालकांच्या / शिक्षकांच्या मदतीने सहभागी होऊ शकतात.
घर, अंगण, बाग, शेत, सोसायटी, कॉलनी, शाळा, महाविद्यालये, संस्था, ऑफिसेस, शासकीय कार्यालये अशा कोणत्याही ठिकाणी पाऊस मोजला जाऊ शकतो. महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यांना ज्यांना पाऊस मोजण्याची इच्छा असेल त्यांनी नाव नोंदवावे.
पर्जन्यमापक तयार करण्याबाबत आणि ते वापरून पाऊस कसा मोजायचा याबाबत ‘भवताल’तर्फे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण - मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य असेल. नावनोंदणी २३ मे २०२२ पर्यंत सुरू राहील.
नाव नोंदवण्यासाठी पुढील लिंक क्लिक करून किंवा QR कोड स्कॅन करून माहिती भरा.
हवा,
पाणी,
पर्यावरणाचा
आरसा!
बदल घडवण्यासाठी
कोणीतरी "आरसा" दाखवावा लागतो,
ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.
भवताल मार्च २०२४
अंकाविषयी...
भवताल मासिक : मार्च २०२४ अंक
लाव्हा टनेल
* अभिजित घोरपडे
महाराष्ट्रा हा दख्खनच्या पठाराचा भाग. ज्वालामुखीच्या उद्रेकांतून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी लाव्हारस बाहेर पडला. तो थंड झाल्यामुळे इथल्या पठाराची निर्मिती झाली. या पठारावर इथल्या ज्वालामुखीच्या अनेक खाणाखुणा आढळतात. त्यापैकी एक म्हणजे अद्भूत आणि एकमेवाद्वितीय असा लाव्हा टनेल!
वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
* सुनील भोईटे
वनस्पतींच्या नावात बरेच काही आहे. या नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे, वनस्पतीची संपूर्ण ओळखच आहे. म्हणूनच नाव महत्त्वाचे. अलीकडे काही मंडळी वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडून वनस्पतींची ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. वनस्पतींच्या नावाची ही आगळीवेगळी, पण अतिशय महत्त्वाची गोष्ट! 'भवताल' मंचावरील हा नवा उपक्रम...
मेघालय-काझीरंगा (भवताल इकोटूर्स)
* इंदूमती जोंधळे
'भवताल इकोटूर्स'तर्फे फेब्रुवारी, मार्च महिन्यात मेघालय-काझीरंगा ही आगळीवे� ...
READ MORE
अनुक्रमणिका
...
भवताल फेब्रुवारी २०२४
MORE DETAILSभवताल जानेवारी २०२४
MORE DETAILSभवताल डिसेंबर २०२३
MORE DETAILSभवताल : दिवाळी अंक २०२३
MORE DETAILSभवताल सप्टेंबर २०२३
MORE DETAILSभवताल ऑगस्ट २०२३
MORE DETAILSकृतिविना
शहाणपण
व्यर्थ आहे.
म्हणूनच,
हरित भविष्यासाठी छोटसं पाऊल !
महाराष्ट्रात सध्या उष्णतेच्या लाटांनी कहर केला आहे. राज्याच्या इतर भागाप्रमाणेच कोकणातही तापमान सातत्याने ४०° वर नोंदवले जात आहे. रायगड जिल्ह्यातील भिरा या ठिकाणाला तापमानाच्या उच्चांकाचा इतिहास आहे. तिथे उन्हाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा देशातील सर्वाधिक ता�